कार्तिकी एकादशी म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीतील एक खूप महत्त्वाचा दिवस. या दिवशी भक्त लोक उपवास करतात, भक्तीसाठी विठ्ठलाची किंवा विष्णूची पूजा करतात. विशेष म्हणजे हा दिवस देवाच्या जागरणाचा मानला जातो - म्हणजे म्हणतात ना विष्णू देव आपली योगनिद्रा संपवून उठतात आणि पृथ्वीवरील आपले कार्य पुन्हा सुरू करतात.
यादिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने प्रार्थना, कीर्तन, भजन करतात, आणि काहीजण पंढरपूरला जाऊन विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे या दिवसापासून घरातल्या शुभ कामांना - विवाह, गृहप्रवेश, नामकरण या गोष्टींना सुरुवात करतात
म्हणजे कार्तिकी एकादशी ही फक्त उपवास किंवा धार्मिक विधी पुरती मर्यादित नसून, ती आपल्या समाजाच्या एकत्रितपणालाही अधोरेखित करते. भक्ती, प्रेम आणि नवीन सुरूवातींचा संदेश आपल्या सगळ्यांना देणारा हा खास दिवस आहे."
हे उत्तर विकिपिडिया च्या आधारावर दिले आहे.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?