शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे महाराष्ट्रात परत आली आहेत. हे ऐतिहासिक शस्त्र महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ही वाघनखे इंग्लंडला कशी काय गेली याबद्दल विशेष माहिती पाहू.
शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघनखांचा वापर केला होता. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि मराठ्यांच्या सत्तेच्या विस्तारात या वाघनखांचा महत्त्वाचा वाटा होता.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या वाघनखांची जपणूक त्यांच्या वंशजांनी केली. पुढे, सातारच्या दरबारात ही वाघनखे जतन करण्यात आली. 19व्या शतकात, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी जेम्स ग्रँट डफ याने ही वाघनखे आपल्या ताब्यात घेतली. डफने त्याच्या सेवेनंतर ही वाघनखे इंग्लंडला नेली आणि त्याच्या वंशजांनी ही शस्त्रे लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला दान केली.
महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे परत आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत आणि ते यशस्वीसुद्धा झाले आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम सोबत एक सामंजस्य करार (MoU) करण्याचे ठरवले होते. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2023 दरम्यान लंडनमध्ये भेट देऊन या वाघनखांची परतफेड निश्चित केली होती आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहिमेसाठी 50 लाख शिष्टमंडळाच्या सहा दिवसांच्या लंडन भेटीसाठी जाहीर केले होते. या मोहिमेत सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव, पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक यांचा समावेश आहे.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?