खूप छान प्रश्न विचारला आहे
वात म्हणजे कापड किंवा एक सुती धाग्यांचा दोरा असतो आणि त्यात बारीक बारीक छिद्रे म्हणजे रंध्र असतात, जी तेल (किंवा तूप) शोषून वर खेचतात.
जसे पाणी झाडाच्या मुळांपासून वर चढते तशीच प्रक्रिया यात होते, यालाच केशाकर्षण क्रिया (Capillary Action) म्हणतात. दिव्यातील तेल वातामधून वर ओढले जाते
जेव्हा आपण वातेला अग्नि लावतो, तेव्हा प्रत्यक्षात वात जळत नाही. वातातून वर आलेले तेल किंवा तूप जळते. त्यामुळे ज्योत पेटते आणि प्रकाश + उष्णता मिळते.
आता त्यातील तेल का संपते?
तेल सतत वातामधून वर खेचले जाते आणि जळून उष्णता व धूरात परिवर्तित होते. हळूहळू सगळे तेल जळून संपते. तेल संपल्यावर वात तेल खेचू शकत नाही, त्यामुळे फक्त वातच जळायला लागते आणि शेवटी दिवा विझतो.
म्हणजेच वात म्हणजे फक्त तेल खेचून वर नेणारा पाईपसारखा असतो. खरेतर तेल (किंवा तूप)च जळते, आणि ते संपल्यावर दिवा विझतो आणि वात ही जळते.
वाचणं सुरू ठेवा
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.
१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.
लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.
जय जिजाऊ | जय शिवराय ||
वाचणं सुरू ठेवा
कंचनजंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे आणि भारतातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची सुमारे 8,586 मीटर म्हणजेच 28,169 फूट आहे. हे शिखर सिक्कीम राज्याच्या उत्तरेस, भारत आणि नेपाळच्या सीमेजवळ हिमालय पर्वतरांगांमध्ये आहे.
अन्य माहिती:
कंचनजंगा उंच शिखर नसून भारतीय आणि नेपाळी संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?