छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.
१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.
लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.
जय जिजाऊ | जय शिवराय ||
वाचणं सुरू ठेवा
लहान मुलाला जरी हा प्रश्न विचारला तरी तो त्यातील एक नाव सांगेल छत्रपती संभाजी महाराज आणि दुसऱ्या मुलाचे नाव राजाराम महाराज होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई निंबाळकर होते. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत राज्य केले. त्यात त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध अनेक लढाया लढल्या.
राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले आणि मुघलांविरुद्ध लढाया चालू ठेवल्या.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?