होळी हा सण केव्हा पासून साजरा केला जातो व का?

Avatar
लोड होत आहे...
<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

संबंधित प्रश्न: जर तुम्हाला कुणी अचानक कानाखाली मारली तर काय कराल?

सगळ्यात पहिले त्याच्या कानशिलात लगावेन आणि  "तू काय समजतोस स्वतःला? माझ्या अंगाला हात लावायला काय तुझ्या आईवडिलांनी शिकवलंय का? आता हे कृत्य तुला महागात पडेल, कारण मी याची तक्रार पोलिसांत करणार आहे. पुन्हा असा मूर्खपणा केलास तर तुला याचे परिणाम भोगावे लागतील." असे भाष्य करेल. 

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी या विषयावर निबंध लिहा?

समाज घडविण्यात युवकांनी जबाबदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. युवकच देशाचे भविष्य ठरवत असतो, समाजाचा विकास, स्थिरता आणि देशाची प्रगती या साऱ्यांची जबाबदारी त्यांच्यावर अवलंबून असते. या निबंधात आपण युवकांच्या जबाबदारी नेमकी कोणत्या मुद्द्यावर असावी याचा विचार करू.

शिक्षण

समाजाच्या विकासाचा पाया हा शिक्षणामुळेच घातला जाऊ शकतो आणि युवकांचे शिक्षण त्यांच्या जबाबदारीत महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत ते नवनवीन शोध लावू शकतात, ज्याने समाजाची प्रगती होते. शिक्षणाने समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देऊ शकतात.

सामाजिक सेवा

युवकांनी समाजसेवेत सक्रिय सहभाग घेणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. यामध्ये रक्तदान, वृद्धाश्रम आणि अनाथालयात मदत आणि स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमात सहभाग घेऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावू शकतात. 

तंत्रज्ञान

आजच्या डिजिटल युगात युवक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात. यात ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग तसेच स्टार्टअप्स मध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात.

पर्यावरणाचे संरक्षण

पर्यावरण संरक्षण मध्ये युवकानी वृक्षारोपण, जलसंवर्धन, वीज बचत, कचरा विघटन आणि अन्य जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राहील.

योग, आरोग्य आणि व्यायाम 

युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि तंदुरुस्ती राखणे हे देखील जबाबदारीचे आहे. नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, योगसने याच्या माध्यमातून युवक शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठेवू शकतात आणि याच्या प्रेरणेने संपूर्ण समाज तंदुरुस्त राहू शकतो.

सांस्कृतिक वारसा

युवकांनी आपला सांस्कृतिक वारसा जपणे आणि त्याचे संवर्धन करणे ही मोठी जबाबदारी आहे. आपल्या परंपरा, सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेऊन त्याचे जतन करणे आवश्यक आहे.

समानता

युवकांनी समाजात सामाजिक समनता ठेवणे गरजेचे आहे. यात जात, धर्म, लिंग, भाषा यांमध्ये भेद न करता सर्वांना समान अधिकारात पुढाकार घेणे आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी  हातभार लावावा.

राजकारण

राजकीय सहभागामुळे युवक मतदान, जनजागृती आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये युवकांनी सहभाग घेणे जबाबदारीचे काम आहे.

सामाजिक सलोखा

युवकांनी समाजात सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. यामध्ये एकता आणि त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, जातीय तणाव आणि संघर्ष टाळणे गरजेचे आहे. यातून युवकांनी संवाद आणि सहकार्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.

आत्मनिर्भरता

आत्मनिर्भरता म्हणजे स्वत:च्या कर्तृत्व यावर विश्वास ठेवणे आणि स्वत:च्या पायावर उभे राहणे महत्वाचे आहे.  यामुळे समाजाची आर्थिक स्थिती सुधारते आणि बेरोजगारी कमी होते.


वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...