समाज घडविण्यात युवकांनी जबाबदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. युवकच देशाचे भविष्य ठरवत असतो, समाजाचा विकास, स्थिरता आणि देशाची प्रगती या साऱ्यांची जबाबदारी त्यांच्यावर अवलंबून असते. या निबंधात आपण युवकांच्या जबाबदारी नेमकी कोणत्या मुद्द्यावर असावी याचा विचार करू.
समाजाच्या विकासाचा पाया हा शिक्षणामुळेच घातला जाऊ शकतो आणि युवकांचे शिक्षण त्यांच्या जबाबदारीत महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत ते नवनवीन शोध लावू शकतात, ज्याने समाजाची प्रगती होते. शिक्षणाने समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देऊ शकतात.
युवकांनी समाजसेवेत सक्रिय सहभाग घेणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. यामध्ये रक्तदान, वृद्धाश्रम आणि अनाथालयात मदत आणि स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमात सहभाग घेऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावू शकतात.
आजच्या डिजिटल युगात युवक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात. यात ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग तसेच स्टार्टअप्स मध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात.
पर्यावरण संरक्षण मध्ये युवकानी वृक्षारोपण, जलसंवर्धन, वीज बचत, कचरा विघटन आणि अन्य जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राहील.
युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि तंदुरुस्ती राखणे हे देखील जबाबदारीचे आहे. नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, योगसने याच्या माध्यमातून युवक शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठेवू शकतात आणि याच्या प्रेरणेने संपूर्ण समाज तंदुरुस्त राहू शकतो.
युवकांनी आपला सांस्कृतिक वारसा जपणे आणि त्याचे संवर्धन करणे ही मोठी जबाबदारी आहे. आपल्या परंपरा, सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेऊन त्याचे जतन करणे आवश्यक आहे.
युवकांनी समाजात सामाजिक समनता ठेवणे गरजेचे आहे. यात जात, धर्म, लिंग, भाषा यांमध्ये भेद न करता सर्वांना समान अधिकारात पुढाकार घेणे आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी हातभार लावावा.
राजकीय सहभागामुळे युवक मतदान, जनजागृती आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये युवकांनी सहभाग घेणे जबाबदारीचे काम आहे.
युवकांनी समाजात सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. यामध्ये एकता आणि त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, जातीय तणाव आणि संघर्ष टाळणे गरजेचे आहे. यातून युवकांनी संवाद आणि सहकार्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.
आत्मनिर्भरता म्हणजे स्वत:च्या कर्तृत्व यावर विश्वास ठेवणे आणि स्वत:च्या पायावर उभे राहणे महत्वाचे आहे. यामुळे समाजाची आर्थिक स्थिती सुधारते आणि बेरोजगारी कमी होते.
वाचणं सुरू ठेवा
काम सोडण्याचा अर्ज एवढा काही अवघड नाहीये. हा अर्ज लिहिताना आपली मत काय आहेत, आपण जॉब का सोडत आहात हे त्यात स्पष्टपणे मांडा आणि तुमच्या मैनेजरला कळेल, त्या भाषेत मांडा.
मजकुरामध्ये आपण कामावर रुजू झाल्याची तारीख, कामाचा कालावधी आणि सोडल्याची तारीख टाकायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला दुसरीकडे जॉब मिळण्यास मदत होईल.
आता सुरुवात करूया,
प्रति,
मॅनेजरचे नाव,
कंपनीचे नाव,
पत्ता.
दिनांक: अर्जाचा दिनांक
विषय: नोकरी सोडण्यासाठी अर्ज
आदरणीय महोदय,
मी [तुमचे नाव], आपल्या कंपनीत [आपले पद] म्हणून काम करत आहे. मी आपल्या कंपनीत [आपल्या कामाचा कालावधी] पासून काम करत आहे. मला आपणास कळवायचे आहे की मी [तारीख] पासून आपल्या कंपनीतून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मी हा निर्णय [नोकरी सोडण्याचे कारण] घेतला आहे. मी आपल्या कंपनीत काम करताना खूप काही शिकलो आहे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य मला नेहमीच लाभले आहे. यासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
कृपया माझा अर्ज आपण स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद.
आपला/आपली विश्वासू,
आपले नाव,
संपर्क क्रमांक,
ईमेल अड्रेस.
लक्षात ठेवा, अर्जात नम्र भाषा वापरा, उद्धट भाषा वापरू नका.
वाचणं सुरू ठेवा
भृगु ऋषी हे सप्तर्षींपैकी एक महान ऋषी होते. त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. भृगु ऋषींची आणि भगवान विष्णुच्या सहनशीलता, करुणा आणि श्रेष्ठता दर्शवते.
आता आपण भृगु ऋषींनी श्री विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णुच्या छातीवर लाथ मारली या प्रसंगाबद्दल पाहुया.
काही ऋषींमध्ये देवतांपैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल विवाद सुरु झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भृगु ऋषी यांना पाठविण्यात आले. भृगु ऋषींनी सर्वप्रथम ब्रह्मदेवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण भगवान ब्रह्मदेव क्रोधित झाले. त्यानंतर त्यांनी भगवान शिवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण शिवही क्रोधित झाले. अखेरीस, भृगु ऋषी विष्णु भगवानांकडे गेले.
भगवान विष्णु त्या वेळी लक्ष्मीसमवेत विश्रांती घेत होते. भृगु ऋषीं संतप्त होऊन विष्णु भगवानांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. यावर विष्णु भगवान शांतपणे उठले आणि त्यांनी भृगु ऋषींना नमस्कार केला, त्यांची चौकशी केली की त्यांच्या पायाला काही लागले तर नाही ना. विष्णु भगवानांचा हा विनम्र आणि सहनशील स्वभाव पाहून भृगु ऋषी आश्चर्यचकित झाले. त्यांनी ओळखले की विष्णु भगवान हेच सर्वात श्रेष्ठ देवता आहेत, कारण त्यांनी क्रोधाचे शांततेत रूपांतर केले.
या कथेवरून असे सिद्ध होते कि, भगवाना विष्णु हे सहनशीलता, करुणा आणि नम्रतेचे प्रतीक आहेत. यामुळे भृगु ऋषींचाही अहंकार लोप पावला आणि भगवान विष्णु यांना श्रेष्ठ देवता मानले गेले.
धन्यवाद ! जर आपल्याला ही कथा आवडल्यास नक्की अपवोट करा.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?