पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा एक वर्ष म्हणजेच 365 दिवस लागतात. म्हणजेच 360 अंश फिरण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात. तर एक अंश फिरण्यासाठी लागणारा वेळ काढण्यासाठी, आपण 365 दिवसाला 360 ने भागावे लागेल.
365 दिवस / 360 अंश = 1.0146 दिवस/अंश
आता तासात याचे उत्तर काढू, एका दिवसात 24 तास असतात म्हणजेच,
आणि याचे अचूक उत्तर आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यासाठी सुमारे 24.35 तास लागतात.
वाचणं सुरू ठेवा
आपण दिवसातून 3-4 वेळा पाणी पिण्याचे महत्व अनेक महत्वाची कारणांसाठी आहे. पाणी आपल्या शरीरातील विविध कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये
पाणी आपल्या शरीर हाइड्रैटेड ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्याला दररोज किमान 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे जेणेकरून शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ऊती, आणि अवयव योग्य प्रकारे कार्य करू शकतील. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि शरीर योग्यरितीने कार्य करू शकेल.
पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पाण्यामुळे आपण घामाच्या रूपात अतिरिक्त उष्णता बाहेर टाकू शकतो. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
पाणी पचन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अन्न पचविण्यासाठी आणि पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्यामुळे अन्नाचे विघटन होते आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते.
जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर पाणी प्यायल्यामुळे आपली ऊर्जा पातळी वाढते. शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि त्यामुळे आपला थकवा कमी होतो.
पाणी पिण्यामुळे त्वचेची आर्द्रता(moisture) टिकून राहते आणि त्वचा चमकदार आणि मऊ बनते. पाण्यामुळे त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
पुरेसं पाणी पिणं हृदयासाठी देखील चांगलं असतं. पाण्यामुळे रकताभिसारण सुधारते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. हृदयाची कार्यक्षमता सुधारली की रक्तदाब नियंत्रित राहतो.
पाणी वजन कमी करण्यास मदत करते . जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे आपल्याला अधिक अन्न खाण्याची गरज कमी होते.
किडनीतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्यामुळे मूत्रपिंडांमध्ये मूतखडे होण्याची शक्यता कमी होते.
सर्वात शेवटी म्हणजे सामान्यतः प्रत्येक व्यक्तीने दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे, परंतु हे प्रमाण त्या व्यक्तीच्या शारीरिक स्थिती, हवामान, आणि अन्य कारणांवर अवलंबून बदलू शकते.
जर ही माहिती आवडली असेल तर कमेन्ट करा आणि अपवोट करा.
वाचणं सुरू ठेवा
सूर्याच्या किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी अंदाजे 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. प्रकाशाचा वेग हा 3,00,000 किमी/सेकंद इतका असतो, म्हणजेच सूर्याची किरणे 3,00,000 किमी/सेकंद या वेगाने प्रवास करतात, आणि सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर सुमारे 15 कोटी किलोमीटर आहे. त्यामुळे सूर्य उगवल्यावर किरणे आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी
15,00,00,000 / 3,00,000 = 500 सेकंद = 8 मिनिटे 20 सेकंद
हा कालावधी लागतो.
वाचणं सुरू ठेवा
भारताची प्रमाण वेळ म्हणजे IST(Indian Standard Time) ही 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावर आधारित असते. ही रेखावृत्त अलाहाबाद (प्रयागराज) मिर्झापूर जवळून जाते. म्हणजेच, आपली सगळी घड्याळं ज्या वेळेवर चालतात ती या 82.5°E रेखावृत्तावरच्या सूर्योदय-सूर्यास्ताच्या हिशोबावर ठरवली जाते.
गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या वेळेत जवळपास 2 तासांचा फरक पडतो. पण तरीही एकच वेळ वापरणं सोयीचं असल्यामुळे 82.5 अंश पूर्व रेखावृत्त आपली प्रमाण वेळ ठरते.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?