भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्ता वरुन ठरवली जाते?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

संबंधित प्रश्न: पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यासाठी किती वेळ लागतो?

पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा एक वर्ष म्हणजेच 365 दिवस लागतात. म्हणजेच 360 अंश फिरण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात. तर एक अंश फिरण्यासाठी लागणारा वेळ काढण्यासाठी, आपण 365 दिवसाला 360 ने भागावे लागेल. 

365 दिवस / 360 अंश ​= 1.0146 दिवस/अंश

आता तासात याचे उत्तर काढू, एका दिवसात 24 तास असतात म्हणजेच, 

1.0146 दिवस×24 तास24.35 तास/अंश1.0146 \text{ दिवस} \times 24 \text{ तास/दिवस} \approx 24.35 \text{ तास/अंश}

आणि याचे अचूक उत्तर आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यासाठी सुमारे 24.35 तास लागतात.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: आपण दिवसातून 3-4 वेळा पाणी का पितो?

आपण दिवसातून 3-4 वेळा पाणी पिण्याचे महत्व अनेक महत्वाची कारणांसाठी आहे. पाणी आपल्या शरीरातील विविध कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये 

शरीराच्या हाइड्रैशनसाठी म्हणजेच पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी

पाणी आपल्या शरीर हाइड्रैटेड ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्याला दररोज किमान 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे जेणेकरून शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ऊती, आणि अवयव योग्य प्रकारे कार्य करू शकतील. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि शरीर योग्यरितीने कार्य करू शकेल.

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी

पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पाण्यामुळे आपण घामाच्या रूपात अतिरिक्त उष्णता बाहेर टाकू शकतो. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी

पाणी पचन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अन्न पचविण्यासाठी आणि पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्यामुळे अन्नाचे विघटन होते आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

ऊर्जा  वाढवण्यासाठी

जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर पाणी प्यायल्यामुळे आपली ऊर्जा पातळी वाढते. शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि त्यामुळे आपला थकवा कमी होतो.

त्वचेत ओलावा राहण्याण्यासाठी

पाणी पिण्यामुळे त्वचेची आर्द्रता(moisture) टिकून राहते आणि त्वचा चमकदार आणि मऊ बनते. पाण्यामुळे त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी

पुरेसं पाणी पिणं हृदयासाठी देखील चांगलं असतं. पाण्यामुळे रकताभिसारण सुधारते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. हृदयाची कार्यक्षमता सुधारली की रक्तदाब नियंत्रित राहतो.

वजन कमी करण्यासाठी

पाणी वजन कमी करण्यास मदत करते . जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे आपल्याला अधिक अन्न खाण्याची गरज कमी होते. 

मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी

किडनीतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्यामुळे मूत्रपिंडांमध्ये मूतखडे होण्याची शक्यता कमी होते.

सर्वात शेवटी म्हणजे सामान्यतः प्रत्येक व्यक्तीने दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे, परंतु हे प्रमाण त्या व्यक्तीच्या शारीरिक स्थिती, हवामान, आणि अन्य कारणांवर अवलंबून बदलू शकते.

जर ही माहिती आवडली असेल तर कमेन्ट करा आणि अपवोट करा.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
योगेश थोरात
योगेश थोरात
02 डिसेंबर 2024 . 5 गुण कमवा
संबंधित प्रश्न: अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय?

Residence  Certificate - अधिवास प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य असल्याचा अधिकृत पुरावा. हे प्रमाणपत्र स्थानिक प्रशासन किंवा सरकारी अधिकाऱ्यांद्वारे जारी केले जाते.

अधिवास प्रमाणपत्राची गरज आपल्याला शैक्षणिक प्रवेशासाठी, नोकरीसाठी, सरकारी योजनांचा विशिष्ट लाभ मिळवण्यासाठी लागू शकते.

अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये आधार कार्ड किंवा ओळखपत्र, रहिवासी पत्ता पुरावा (वीज बिल, रेशन कार्ड, भाडे करार, इ.), जन्मतारीख पुरावा (जन्मदाखला किंवा शाळेचा दाखला)

अर्जदाराने भरलेला अर्ज (स्थानिक प्राधिकरणाकडे उपलब्ध) आणि फोटो असावा लागतो.

हा अर्ज अचूकपने भरून आपल्या स्थानिक तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, किंवा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र ई-सेवा पोर्टलद्वारे सबमिट करता येतो.

हे प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट प्रदेशाशी असलेल्या संबंधाचे अधिकृत डॉक्यूमेंट आहे, जो अनेक वेळा महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांमध्ये आवश्यक असतो.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...