नमस्कार मित्रा प्रश्न विचारल्याबद्दल. तर १२ ज्योतिर्लिंगे ही भगवान शंकराचे पवित्र प्रतीक मानले जातात. या ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीच्या कथा पुराणांमध्ये सांगितल्या जातात. 'ज्योतिर्लिंग' म्हणजे "ज्योतीचा लिंग" म्हणजेच प्रकाशाचा दिव्य स्तंभ असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या संबंधित वेग-वेगळ्या पौराणिक कथा सांगितल्या जातात. मी क्रमवारी पद्धतीने आपल्याला ज्योतिर्लिंगाविषयी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग - औरंगाबाद, महाराष्ट्र
घृष्णा नावाच्या शिवभक्त महिलेची कथा या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले.
एका भीमा नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता. त्याने शिवभक्तांना त्रास दिला, तेव्हा भगवान शिवाने त्याचा अंत केला आणि तेथेच ज्योतिर्लिंग प्रकट झाले आणि नंतर ते भिमाशंकर नावाने ओळखले जाऊ लागले.
हे ज्योतिर्लिंग गौतम ऋषी यांच्याशी संबंधित आहे. गौतम ऋषींनी येथे भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि शिवाने त्यांना आशीर्वाद देऊन तेथेच ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले.
सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा दक्ष प्रजापतीच्या कन्या सती आणि चंद्रदेवाशी संबंधित आहे. दक्षाने चंद्राला शाप दिला की त्याचे तेज मंद होईल. तेव्हा चंद्रदेवाने शिवाची उपासना केली आणि त्याला शिवाकडून आशीर्वाद मिळाला की तो पुन्हा तेजस्वी होईल. या ठिकाणी शिवाने चंद्राला आशीर्वाद दिला, त्यामुळे हे ज्योतिर्लिंग "सोमनाथ" म्हणून ओळखले जाते.
ही कथा कुमार कार्तिकेय आणि भगवान गणेशाच्या लग्नाशी संबंधित आहे. गणेशाचे लग्न आधी झाल्याने कार्तिकेय रुसून कैलास पर्वत सोडून दक्षिणेकडे निघून गेला. शिव आणि पार्वती त्यांच्या पुत्राला परत आणण्यासाठी मल्लिकार्जुन पर्वतावर आले आणि शिवाने ज्योतिर्लिंग रूपात तेथे वास्तव्य केले.
उज्जैनच्या एका ब्राह्मण कुटुंबाने शिवाची अत्यंत भक्ती केली होती. एकदा त्यांच्या गावात राक्षस दुष्ट प्रवृत्तीने हल्ला केला. ब्राह्मण कुटुंबाने भगवान शिवाची प्रार्थना केली आणि शिवाने "महाकाल" रूप धारण करून राक्षसाचा संहार केला. त्यानंतर तेथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले.
पुराणांनुसार, भगवान शिव यांनी इक्ष्वाकु वंशातील मांधाता नावाच्या राजाने नर्मदा नदीच्या तटावरील पर्वतावर उपासना केली आणि भगवान शिव प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले. आणि शिव यांनी ओंकार नावाने हे ज्योतिर्लिंग तिथे प्रकट केले.
महाभारतातील कथानुसार पांडवांनी युद्धानंतर आपल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली. शिव त्यांना क्षमा करण्यास तयार नव्हते, म्हणून त्यांनी बैलाचे रूप घेतले आणि केदारनाथ येथे लपले. पांडवांनी त्यांना ओळखले आणि तेथेच शिव ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले.
पुराणांनुसार, भगवान शिवने काशीला अतिशय पवित्र मानले आहे. काशी ही त्यांच्या आराधनेचे प्रिय ठिकाण आहे आणि ते येथे विश्वनाथ म्हणून विराजमान आहेत. असे मानले जाते की जे कोणी येथे मरण पावते त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
येथे रावणाने भगवान शिवाचे घोर तप केला आणि त्याने ज्योतिर्लिंग प्राप्त केले. रावणाने याची पूजा केली, या ज्योतिर्लिंगाला बैजनाथ असेही म्हटले जाते.
एकदा दारुक नावाच्या राक्षसाने शिवभक्तांवर अत्याचार केला. भगवान शिवने त्याचा संहार करून भक्तांची रक्षा केली आणि येथे नागेश्वर म्हणून ज्योतिर्लिंग प्रकट झाले.
रामायणातील कथेनुसार, भगवान रामाने लंकेला जाण्यापूर्वी शिवाची पूजा करण्यासाठी येथे शिवलिंग स्थापन केले होते. त्यामुळे या स्थानाचे नाव रामेश्वरम पडले.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?