छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजनाबद्दल इतिहासात कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यांच्या वजनाची विशिष्ट नोंद कोणत्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये किंवा शिलालेखात उपलब्ध नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, चपळता, आणि युद्धकौशल्याचे प्रतीक आहे आणि त्यांनी बलाढ्य शत्रूंचा पराभव करत स्वराज्य स्थापन केले. आपण त्यांच्या वजनाबद्दलच्या माहितीपेक्षा अधिक महत्त्व त्यांच्या धाडसाला दिले पाहिजे.
उत्तर न देऊ शकल्यामुळे क्षमा असावी.
जय जिजाऊ, जय शिवराय
वाचणं सुरू ठेवा
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते. कान्होजी आंग्रे हे सामान्य कुटुंबातील होते, पर त्यांच्या चातुर्य आणि धाडसामुळे राजांनी त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख बनविले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजाकडून होणारया सागरी आक्रमणांना रोखण्याचे काम केले . शिवाजी महाराजांच्या नौदल धोरणानुसार त्यांनी आरमाराची रचना केली, तसेच त्यांनी सागरी किल्ले बांधले. कान्होजी आंग्रे यांचे योगदान मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याला अभूतपूर्व ऊंचीवर घेऊन गेले.
मराठा आरमाराने इंग्रज, पोर्तुगीज सारख्या बलाढ्य शत्रुना नेस्तनाभूत केले. त्यांच्या सागरी लढायांनी मराठा साम्राज्याचे सागरी वर्चस्व स्थिर झाले आणि तिथे व्यापारही होऊ लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारण्यात कान्होजी आंग्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वाचणं सुरू ठेवा
हे प्रश्न खूपच रंजक आणि इतिहासप्रेमींना भावणारा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत कुशल अश्वारूढ योद्धे होते आणि त्यांच्या घोड्यांचं त्यांच्या युद्धनीतीमध्ये फार महत्त्वाचं स्थान होतं.
महाराजांच्या घोड्याची नावे
मोती
विश्वास
तुरंगी
इंद्रायणी
गजरा
रणभीर
कृष्णा – ज्याचा उपयोग महाराजांनी राज्याभिषेकानंतर केला, असं म्हटल जातं.
पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल,
इतिहासातील अधिकृत दस्तऐवजांमध्ये (जसं की बखरी, पत्रव्यवहार, तत्कालीन फारसी नोंदी) या घोड्यांची नावे स्पष्टपणे दिलेली नाहीत. त्यामुळे याला आपण लोकपरंपरेतील माहिती म्हणूनच स्वीकारावं लागलं.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?