शिवाजी महाराजांचे वजन किती होते?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

महेश ढेकळे
महेश ढेकळे
06 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते.  कान्होजी आंग्रे हे सामान्य कुटुंबातील होते, पर त्यांच्या चातुर्य आणि धाडसामुळे राजांनी त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख बनविले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजाकडून होणारया सागरी आक्रमणांना रोखण्याचे काम केले . शिवाजी महाराजांच्या नौदल धोरणानुसार त्यांनी आरमाराची रचना केली, तसेच त्यांनी सागरी किल्ले बांधले. कान्होजी आंग्रे यांचे योगदान मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याला अभूतपूर्व ऊंचीवर घेऊन गेले.

मराठा आरमाराने इंग्रज, पोर्तुगीज सारख्या बलाढ्य शत्रुना नेस्तनाभूत केले. त्यांच्या सागरी लढायांनी मराठा साम्राज्याचे सागरी वर्चस्व स्थिर झाले आणि तिथे व्यापारही होऊ लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारण्यात कान्होजी आंग्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय?

हे प्रश्न खूपच रंजक आणि इतिहासप्रेमींना भावणारा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत कुशल अश्वारूढ योद्धे होते आणि त्यांच्या घोड्यांचं त्यांच्या युद्धनीतीमध्ये फार महत्त्वाचं स्थान होतं.

महाराजांच्या घोड्याची नावे

  • मोती

  • विश्वास

  • तुरंगी

  • इंद्रायणी

  • गजरा

  • रणभीर

  • कृष्णा – ज्याचा उपयोग महाराजांनी राज्याभिषेकानंतर केला, असं म्हटल जातं.

पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल,
इतिहासातील अधिकृत दस्तऐवजांमध्ये (जसं की बखरी, पत्रव्यवहार, तत्कालीन फारसी नोंदी) या घोड्यांची नावे स्पष्टपणे दिलेली नाहीत. त्यामुळे याला आपण लोकपरंपरेतील माहिती म्हणूनच स्वीकारावं लागलं.



वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.

१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.

लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.

जय जिजाऊ | जय शिवराय ||

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...