Residence Certificate - अधिवास प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य असल्याचा अधिकृत पुरावा. हे प्रमाणपत्र स्थानिक प्रशासन किंवा सरकारी अधिकाऱ्यांद्वारे जारी केले जाते.
अधिवास प्रमाणपत्राची गरज आपल्याला शैक्षणिक प्रवेशासाठी, नोकरीसाठी, सरकारी योजनांचा विशिष्ट लाभ मिळवण्यासाठी लागू शकते.
अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये आधार कार्ड किंवा ओळखपत्र, रहिवासी पत्ता पुरावा (वीज बिल, रेशन कार्ड, भाडे करार, इ.), जन्मतारीख पुरावा (जन्मदाखला किंवा शाळेचा दाखला)
अर्जदाराने भरलेला अर्ज (स्थानिक प्राधिकरणाकडे उपलब्ध) आणि फोटो असावा लागतो.
हा अर्ज अचूकपने भरून आपल्या स्थानिक तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, किंवा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र ई-सेवा पोर्टलद्वारे सबमिट करता येतो.
हे प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट प्रदेशाशी असलेल्या संबंधाचे अधिकृत डॉक्यूमेंट आहे, जो अनेक वेळा महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांमध्ये आवश्यक असतो.
वाचणं सुरू ठेवा
भारताची प्रमाण वेळ म्हणजे IST(Indian Standard Time) ही 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावर आधारित असते. ही रेखावृत्त अलाहाबाद (प्रयागराज) मिर्झापूर जवळून जाते. म्हणजेच, आपली सगळी घड्याळं ज्या वेळेवर चालतात ती या 82.5°E रेखावृत्तावरच्या सूर्योदय-सूर्यास्ताच्या हिशोबावर ठरवली जाते.
गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या वेळेत जवळपास 2 तासांचा फरक पडतो. पण तरीही एकच वेळ वापरणं सोयीचं असल्यामुळे 82.5 अंश पूर्व रेखावृत्त आपली प्रमाण वेळ ठरते.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?