शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे महाराष्ट्रात परत आली आहेत. हे ऐतिहासिक शस्त्र महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ही वाघनखे इंग्लंडला कशी काय गेली याबद्दल विशेष माहिती पाहू.
शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघनखांचा वापर केला होता. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि मराठ्यांच्या सत्तेच्या विस्तारात या वाघनखांचा महत्त्वाचा वाटा होता.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या वाघनखांची जपणूक त्यांच्या वंशजांनी केली. पुढे, सातारच्या दरबारात ही वाघनखे जतन करण्यात आली. 19व्या शतकात, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी जेम्स ग्रँट डफ याने ही वाघनखे आपल्या ताब्यात घेतली. डफने त्याच्या सेवेनंतर ही वाघनखे इंग्लंडला नेली आणि त्याच्या वंशजांनी ही शस्त्रे लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला दान केली.
महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे परत आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत आणि ते यशस्वीसुद्धा झाले आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम सोबत एक सामंजस्य करार (MoU) करण्याचे ठरवले होते. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2023 दरम्यान लंडनमध्ये भेट देऊन या वाघनखांची परतफेड निश्चित केली होती आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहिमेसाठी 50 लाख शिष्टमंडळाच्या सहा दिवसांच्या लंडन भेटीसाठी जाहीर केले होते. या मोहिमेत सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव, पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक यांचा समावेश आहे.
वाचणं सुरू ठेवा
समाज घडविण्यात युवकांनी जबाबदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. युवकच देशाचे भविष्य ठरवत असतो, समाजाचा विकास, स्थिरता आणि देशाची प्रगती या साऱ्यांची जबाबदारी त्यांच्यावर अवलंबून असते. या निबंधात आपण युवकांच्या जबाबदारी नेमकी कोणत्या मुद्द्यावर असावी याचा विचार करू.
समाजाच्या विकासाचा पाया हा शिक्षणामुळेच घातला जाऊ शकतो आणि युवकांचे शिक्षण त्यांच्या जबाबदारीत महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत ते नवनवीन शोध लावू शकतात, ज्याने समाजाची प्रगती होते. शिक्षणाने समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देऊ शकतात.
युवकांनी समाजसेवेत सक्रिय सहभाग घेणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. यामध्ये रक्तदान, वृद्धाश्रम आणि अनाथालयात मदत आणि स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमात सहभाग घेऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावू शकतात.
आजच्या डिजिटल युगात युवक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात. यात ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग तसेच स्टार्टअप्स मध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात.
पर्यावरण संरक्षण मध्ये युवकानी वृक्षारोपण, जलसंवर्धन, वीज बचत, कचरा विघटन आणि अन्य जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राहील.
युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि तंदुरुस्ती राखणे हे देखील जबाबदारीचे आहे. नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, योगसने याच्या माध्यमातून युवक शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठेवू शकतात आणि याच्या प्रेरणेने संपूर्ण समाज तंदुरुस्त राहू शकतो.
युवकांनी आपला सांस्कृतिक वारसा जपणे आणि त्याचे संवर्धन करणे ही मोठी जबाबदारी आहे. आपल्या परंपरा, सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेऊन त्याचे जतन करणे आवश्यक आहे.
युवकांनी समाजात सामाजिक समनता ठेवणे गरजेचे आहे. यात जात, धर्म, लिंग, भाषा यांमध्ये भेद न करता सर्वांना समान अधिकारात पुढाकार घेणे आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी हातभार लावावा.
राजकीय सहभागामुळे युवक मतदान, जनजागृती आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये युवकांनी सहभाग घेणे जबाबदारीचे काम आहे.
युवकांनी समाजात सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. यामध्ये एकता आणि त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, जातीय तणाव आणि संघर्ष टाळणे गरजेचे आहे. यातून युवकांनी संवाद आणि सहकार्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.
आत्मनिर्भरता म्हणजे स्वत:च्या कर्तृत्व यावर विश्वास ठेवणे आणि स्वत:च्या पायावर उभे राहणे महत्वाचे आहे. यामुळे समाजाची आर्थिक स्थिती सुधारते आणि बेरोजगारी कमी होते.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?