सफरचंद खाण्यामुळे वजन वाढत नाही, तर कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण सफरचंदात खूपच कमी कैलरीज असतात आणि ते जीवनसत्वांनी भरलेले असते.
सफरचंदामध्ये त्याच्या वजनाच्या अर्ध्या कैलरीज असतात, समजा 182 ग्रामचे मध्यम आकाराचे सफरचंद असेल तर त्यामध्ये 90-95 कैलरीज असू शकतात.
सफरचंद जीवनसत्वांनी भरपूर असते आणि वजन कमी होते:
सफरचंदातील फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट गच्च वाटते आणि त्याने भूक लागत नाही. आपण सफरचंद कच्चे खाऊ शकता, सफरचंदाच्या फोडी करून त्या सलाडमध्ये घालून खाऊ शकता किंवा दुधात बारीक फोडी करून मिक्सर मध्ये बारीक करून सुद्धा पिऊ शकता.
आपल्याला वाटत असेल कितीही सफरचंद खाल्ल तरी वजन वाढत नाही, पण तास नाहीये. सफरचंद खाण्यामुळे वजन वाढत नाही हे देखील कहर असलं तरी ते नेहमी प्रमाणातच खाल्ल पाहिजे.
सफरचंद खा, कमी व्हा
वाचणं सुरू ठेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजनाबद्दल इतिहासात कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यांच्या वजनाची विशिष्ट नोंद कोणत्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये किंवा शिलालेखात उपलब्ध नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, चपळता, आणि युद्धकौशल्याचे प्रतीक आहे आणि त्यांनी बलाढ्य शत्रूंचा पराभव करत स्वराज्य स्थापन केले. आपण त्यांच्या वजनाबद्दलच्या माहितीपेक्षा अधिक महत्त्व त्यांच्या धाडसाला दिले पाहिजे.
उत्तर न देऊ शकल्यामुळे क्षमा असावी.
जय जिजाऊ, जय शिवराय
वाचणं सुरू ठेवा
आंबट पदार्थ म्हणजे लिंबू, कैरी, चिंच, कोकम हे थेट आपल्या पोटातजाण्याआधी आपल्या घशातून जातात. से सगळे ऍसिडिक असतात. ते आपल्या पचनसंस्थेवर थोडा परिणाम करू शकतात.
जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा त्याला आधीच थोडा सर्दीखोकला असेल तर आंबट खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम जास्त दिसू शकतो.
उदाहरणासाठी , जर एखाद्याच्या घशात आधीच सूज असेल, तर आंबट खाल्ल्यावर जळजळ होऊ शकते, खवखव वाढू शकते आणि मग खोकला किंवा सर्दी जरा जास्त जाणवू शकतो .
पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनाच आंबट खाल्ल्यावर सर्दी खोकला होतो. काही लोकांना काहीच होत नाही. हे असत शरीराच्या प्रतिकारशक्तीवर, हवामानावर आणि त्या व्यक्तीच्या राहनीमानावर अवलंबून असतं.
शेवटी उत्तराकड़े येऊ, आंबट खाल्ल्याने सर्दी-खोकला होत नाही, पण जर शरीर आधीच कमकुवत असेल किंवा घसा नाजुक असेल तर लक्षणं वाढू शकतात. म्हणून अशावेळी आंबट खान थोडं टाळावं.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?