श्री अक्षरावरून मुला - मुलींची नावे आहेत, पण जितकी मिळाली तितकी आपल्या समोर आहेत, ती वाचा आणि त्यातील एखादे आवडले तर नक्की ठेवा.
वाचणं सुरू ठेवा
भृगु ऋषी हे सप्तर्षींपैकी एक महान ऋषी होते. त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. भृगु ऋषींची आणि भगवान विष्णुच्या सहनशीलता, करुणा आणि श्रेष्ठता दर्शवते.
आता आपण भृगु ऋषींनी श्री विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णुच्या छातीवर लाथ मारली या प्रसंगाबद्दल पाहुया.
काही ऋषींमध्ये देवतांपैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल विवाद सुरु झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भृगु ऋषी यांना पाठविण्यात आले. भृगु ऋषींनी सर्वप्रथम ब्रह्मदेवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण भगवान ब्रह्मदेव क्रोधित झाले. त्यानंतर त्यांनी भगवान शिवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण शिवही क्रोधित झाले. अखेरीस, भृगु ऋषी विष्णु भगवानांकडे गेले.
भगवान विष्णु त्या वेळी लक्ष्मीसमवेत विश्रांती घेत होते. भृगु ऋषीं संतप्त होऊन विष्णु भगवानांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. यावर विष्णु भगवान शांतपणे उठले आणि त्यांनी भृगु ऋषींना नमस्कार केला, त्यांची चौकशी केली की त्यांच्या पायाला काही लागले तर नाही ना. विष्णु भगवानांचा हा विनम्र आणि सहनशील स्वभाव पाहून भृगु ऋषी आश्चर्यचकित झाले. त्यांनी ओळखले की विष्णु भगवान हेच सर्वात श्रेष्ठ देवता आहेत, कारण त्यांनी क्रोधाचे शांततेत रूपांतर केले.
या कथेवरून असे सिद्ध होते कि, भगवाना विष्णु हे सहनशीलता, करुणा आणि नम्रतेचे प्रतीक आहेत. यामुळे भृगु ऋषींचाही अहंकार लोप पावला आणि भगवान विष्णु यांना श्रेष्ठ देवता मानले गेले.
धन्यवाद ! जर आपल्याला ही कथा आवडल्यास नक्की अपवोट करा.
वाचणं सुरू ठेवा
छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि मुलीचे नाव भवानीबाई होते. त्यांना शाहूजी महाराज किंवा शाहू छत्रपती म्हणूनही ओळखले जाते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याला एक नवी दिशा दिली.
शाहू महाराजांचा जन्म 1682 साली झाला. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्याकडे झाला. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या मुघल सत्तेशी संघर्ष करावा लागला, आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैद केले होते. ते 17 वर्षे मुघलांच्या ताब्यात होते. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैदतून सोडून केले.
शाहू महाराजांच्या सिंहासनारूढीमुळे मराठा साम्राज्य विस्ताराला सुरूवात केली. त्यांनी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना आपले प्रधान (पेशवे) नेमले, ज्यामुळे पेशवाई व्यवस्था अधिक बळकट झाली. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने भारतीय उपखंडावर आपली सत्ता विस्तारली आणि त्यांचा काळ मराठ्यांसाठी उत्तम मानला जात होता.
नोट: कृपया माहिती चुकीची वाटत असेल, तर दुरुस्तीसाठी टिप्पणी करा.
वाचणं सुरू ठेवा
लहान मुलाला जरी हा प्रश्न विचारला तरी तो त्यातील एक नाव सांगेल छत्रपती संभाजी महाराज आणि दुसऱ्या मुलाचे नाव राजाराम महाराज होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई निंबाळकर होते. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत राज्य केले. त्यात त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध अनेक लढाया लढल्या.
राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले आणि मुघलांविरुद्ध लढाया चालू ठेवल्या.
वाचणं सुरू ठेवा
मी काही नावे सुचवली आहेत, कदाचित काही नावे आपल्याला पसंत पडतील.
वाचणं सुरू ठेवा
भक्तांवरील सर्व संकट दूर करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. आपण गणपतीची गाणी ऐकताना "अष्टविनायका तुझा महिमा कसा" हे गाणं जारी ऐकलं तरी आपल्याला अष्टविनायक गणपतीची नावे आणि ठिकाण समजतील. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ ठिकानावरील महत्वाची गणपतीची मंदिरे आणि अष्टविनायकाची यात्रा पूर्ण केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. यामध्ये आपण अष्टविनायक, त्यांची ठिकाणे आणि विशेष महत्व जाणणार आहोत.
ठिकाण: मोरगाव, पुणे जिल्हा
मोरगाव मंदिर अष्टविनायक यात्रेतील पहिले मंदिर आहे. या गणपतीला मयूरेश्वर सुद्धा म्हटले जाते, कारण त्याचे वाहन मोर आहे.
ठिकाण: सिद्धटेक, नगर जिल्हा
ह्या गणपतीच्या पूजेने सर्व इच्छांची पूर्ती होते, असे भाविक म्हणतात. हे मंदिर भीमा नदीच्या काठी आहे.
ठिकाण: पाली, रायगड जिल्हा
हा गणपती आपला भक्त बल्लाळाच्या नावावर आहे आणि हा एकमेव गणपती असा आहे जो भक्ताच्या नावावर ओळखला जातो.
ठिकाण: महड, रायगड जिल्हा
वरदविनायक गणपती भक्तांना वरदान देतो आणि हे मंदिर अत्यंत साधे आहे.
ठिकाण: थेऊर, पुणे जिल्हा
हा गणपती चिंतांचा नाश करणारा मानला जातो. हे मंदिर श्रीमंत पेशव्यांच्या काळातील आहे.
ठिकाण: लेण्याद्री, जुन्नर, पुणे जिल्हा
हे एकमात्र मंदिर असे आहे जे पायरया चढून एका गुहेत जावे लागते आणि ही गणेशाची मूर्ती गिरिजा देवीच्या गर्भातून प्रकट झाल्याचे मानले जाते.
ठिकाण: ओझर, जुन्नर, पुणे जिल्हा
हा गणपती विघ्नांचे निवारण करणारा आहे. या मंदिरात अत्यंत सुंदर प्रवेशद्वार आणि दीपमाळ आहे.
ठिकाण: रांजणगाव, पुणे जिल्हा
महागणपतीची मूर्ती अतिशय शक्तिशाली मानली जाते. हा गणपती महाभारतात श्रीकृष्णाने पूजलेला गणपती आहे.
उत्तर आवडल्यास लाइक करायला विसरू नका
वाचणं सुरू ठेवा
श्रीमंत या शब्दाला मराठीत समानार्थी शब्द "धनाढ्य," "संपन्न," "संपत्तीवान," "धनवान," किंवा "विभूतीमान" असा होतो. उदाहरणार्थ, धनाढ्य असण्याबरोबरच श्रीमंत माणसाने दानशूर असणे सुद्धा आवश्यक असते .
वाचणं सुरू ठेवा
पोपट ज्या रंगाचा असतो तो म्हणजे पोपटी रंग. पोपटी रंगाला इंग्रजीत काही विशेष नाव नाहीत, पण आपण त्याला Greenish, Light Green किंवा Pale Green असे म्हणू शकतो. हा रंग जरासा हलका हिरवट असतो.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?